Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअत्याचार वाढल्याने महिला सक्षमीकरण कसे साधणार ?

अत्याचार वाढल्याने महिला सक्षमीकरण कसे साधणार ?

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील पारोळा येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व हत्या ही घटना दुर्दैवी आहे.

- Advertisement -

मात्र, राज्यातील महिला, मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटनांची राज्यातील मंत्र्यांनी आजवर साधी दखल देखील घेतला नाही.

मग महिला सक्षमीकरण कसे साधणार? अशी टीका भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. बुधवारी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, आ.राजुमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष उज्जवला बेंडाळे, माजी आ.स्मिता वाघ यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

सौ.वाघ पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील पारोळा येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व हत्याप्रकरणी भाजप महिला आघाडीच्यावतीने दि.11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, पारोळ्यात मयत विद्यार्थिनीच्या घरीदेखील भेट घेतली असून राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. राज्यातील महिला, मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटनांची राज्यातील मंत्र्यांनी आजवर साधी दखल देखील घेतला नाही.

महाविकास आघाडीने राज्याची स्थिती वाईट करून ठेवली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा फक्त टेप वाजवू नका, त्याची खरोखर जबाबदारी निभवण्याची गरज आहे.

आघाडी सरकारच्या काळात अत्याचाराच्या घटना वाढत असून महिलांच्या सुरक्षेसाठी काय करणार ते सांगा, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा.

पोलीस दलातील उणिवा गृहमंत्र्याने कमी कराव्या. फॉरेन्सिक लॅबला अद्ययावत केले पाहिजे. महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला घेतल्या जात नाही. महिला सुरक्षेसाठी नेमके काय करणार आहे, ते सांगा, या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या