मोबाईल खेळू नको म्हटल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात बोरावके कॉलेज परिसरात असणार्‍या इंदिरानगर भागात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा आरुष अनिल निकाळजे याने राहत्या घरी गळफास घेऊन त्याची जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.

या परिसरात राहणारे स्थानिक नगरसेवक यांनी सांगितले की, सारखा मोबाईल खेळू नको असे आरुष यास त्याच्या वडिलांनी म्हटल्याने या मुलाने आत्महत्या केली. त्यास तातडीने साखर साखर कामगार रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी आरुषला उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. या घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.शेलार हे पुढील तपास करीत आहेत.

काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरालगत असणार्‍या रांजणखोल या गावांमध्ये देखील एका चौदा वर्षीय मुलाने वडील मोबाईल खेळताना रागवले म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *