Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिवाळीचा खरा जल्लोष रेड्यांच्या झुंजीनंतरच...

दिवाळीचा खरा जल्लोष रेड्यांच्या झुंजीनंतरच…

मनमाड | प्रतिनिधी

राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. मनमाड शहरात गवळी समाजात पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

- Advertisement -

दर वर्षीप्रमाणे यंदाही ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दुध संघा तर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. त्यात शहर परिसरासह इतर तालुक्यातील अनेक गवळी बांधव रेडे घेवून आले होते. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दिन दिन दिवाळी गाई- म्हशी ओवाळी अशी म्हण प्रचलित आहे.पशु धनाची पूजा करून त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे.

मनमाड शहरात पाडव्याच्या दिवशी गवळी बांधव आपल्या रेड्याला आकर्षक पद्धतीने सजवून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन आले होते. त्यानंतर भाऊबीजच्या दिवशी गवळी समाज व शहर दुध संघातर्फे दरगुडे मैदानावर रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील मोठ्या संख्येने गवळी बांधव रेडे घेवून आले होते. झुंजीत जिंकलेल्या रेड्याच्या मालकाला पारितोषिक देवून त्याचा सन्मान करण्यात आला.

शिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांचाही सत्कार करण्यात आला.

रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही, तो पर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही असे गवळी बांधवानी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या