Monday, April 29, 2024
Homeनाशिकविंचूरच्या 'त्या' बेपत्ता मुलींचे मृतदेह आढळले

विंचूरच्या ‘त्या’ बेपत्ता मुलींचे मृतदेह आढळले

विंचूर l Vinchur (प्रतिनिधी)

येथील दोन अल्पवयीन मुली गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या होत्या.त्यांचे मृतदेह आज पालखेड डाव्या कालव्यात आढळून आले.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील खाडे गल्लीतील अर्पिता सुनील गायकवाड (वय १५) व कोमल संतोष गायकवाड (वय १४) या चुलत बहिणी (दि. २) एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाही.

त्यामुळे आई वडील व नातलगांनी बरीच शोधाशोध केली. व अखेर काल (दि. ३) रोजी कोमल हिचे वडील संतोष गायकवाड यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आणि आज (दि. ४) रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास कोमल हिचा मृतदेह शिरसगाव शिवार (ता. येवला) येथे पालखेड डाव्या कालव्यामध्ये विद्युत पंपाच्या पाईपला अडकलेल्या स्थितीत आढळून आला.

तर अर्पिता हिचा मृतदेह दुपारी दोन वाजेच्या सुमारास वेळापूर (ता. निफाड) शिवारात पालखेड डाव्या कालव्यात आढळून आला.

याबाबत माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. राहुल वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. व बेपत्ता मुलींच्या पालकांना बोलावून मृतदेह हे बेपत्ता मुलींचेच असल्याची खातरजमा केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय निफाड व येवला येथे पाठविण्यात आले.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात या मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींंच्या बेपत्ता प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु मृतदेह सापडल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पो. नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. उपनिरीक्षक उदय मोहरे हवा. राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या