नवापूर पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यात बर्डफ्लूचा शिरकाव

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नवापूर पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यात देखील बर्ड फ्लू ने शिरकाव केला असून,दोन कावळयांचा मृत्यू एन १,एच ५ पॉझिटिव्ह आला आहे. धुरखेडा येथील मृत कावळ्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

नवापूर तालुक्यात गेल्या महिन्यात पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांवर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे सुमारे सहा लाख कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून २० लाखांवर अंडी नष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, अक्कलकुवा येथील राययसिंगपूर भागात दि.१२ जानेवारी रोजी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या कावळ्यांचा अहवाल दि.१७ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला असून दोन्ही कावळ्यांचा मृत्यू एन १, एच ५ संसर्गाने झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

त्यामुळे नवापुरपाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातदेखील बर्ड फ्ल्ूची लागण झाली आहे. दरम्यान, धुरखेडा तालुका शहादा येथे दि.१० फेब्रुवारी रोजी १२ कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यातील तीन कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *