Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेध‘या’ गोष्टींमध्ये आहे आयुष्य बदलण्याची क्षमता

‘या’ गोष्टींमध्ये आहे आयुष्य बदलण्याची क्षमता

1 )गीता : वेदांचे ज्ञान नव्या पद्धतीने व्यवस्थित केले असेल तर ते भगवान श्रीकृष्णाने. गीतेच्या भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या मार्गाला समजून घेतले नाही तर काहीच समजलं नाही.

2 )योग : योग धर्म आणि अध्यात्माचा वैज्ञानिक मार्ग आहे. या माध्यमाने आयुष्य बदलू शकतं. योग प्रामुख्याने ब्रह्मयोग आणि कर्मयोगामध्ये विभागलेला आहे. पतंजलीने योगाला एक व्यवस्थित आकार दिला आहे. योग सूत्र योगाचे सर्वात उत्तम ग्रंथ आहे.

- Advertisement -

3 )आयुर्वेद : आयुर्वेदानुसार आयुष्य जगण्याने कोणत्याही प्रकारांचे आजार आणि दुःख होत नाही. आयुर्वेदाचे पहिले उपदेशक ऋषी धन्वंतरी होत. तत्पश्चात च्यवन, सुश्रुत आणि चरक ऋषी प्रामुख्याने होत. अश्विनीकुमार यांनी चिकित्साशास्त्र शोधले आहे.

4 )षड्दर्शन : भारतातील या सहा तत्त्वज्ञानामध्ये जगातील सर्व धर्म आणि दर्शनाचे सिद्धांत आहे. हे सहा दर्शन आहेत – 1. न्याय, 2. वैशेषिक, 3. मीमांसा, 4. सांख्य 5. वेदांत आणि 6. योग.

5 )ज्योतिषशास्त्र : ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच भाग आहेत. सामुद्रिक शास्त्र, हस्तरेखा विज्ञान, अंक शास्त्र, अंगठा शास्त्र, ताड़पत्र विज्ञान, नंदी नाड़ी ज्योतिष, पंच पक्षी सिद्धांत, नक्षत्र ज्योतिष, वैदिक ज्योतिष, रमल शास्त्र, पांचा विज्ञान इत्यादी. ज्योतिष म्हणजे वेदांचा डोळा असे म्हटले गेले आहे.

6 )वास्तू शास्त्र : वास्तुशास्त्रानुसारच यज्ञमंडप, देऊळ, घर आणि शहर बांधले जाते. दक्षिण भारतात वास्तू विज्ञानाचा पाया मय दानवाने ठेवला, तर उत्तर भारतात विश्वकर्माने. वास्तुशास्त्रानुसार घर असल्यावर सर्व सुख मिळतात आणि आयुष्य सुखी होतं.

7 )यज्ञ : यज्ञाला विधी किंवा संस्कार मानू नये. वेदानुसार यज्ञ पाच प्रकारांचे असतात. 1. ब्रह्मयज्ञ, 2. देवयज्ञ, 3. पितृयज्ञ, 4. वैश्वदेव यज्ञ आणि 5. अतिथी यज्ञ. देव यज्ञालाच अग्निहोत्र कर्म म्हटले गेले आहे. यज्ञाचा तपशील आयुर्वेदामध्ये मिळतो.

8 )तंत्र शास्त्र : तंत्राला मुळात शैव आगम शास्त्राशी निगडित म्हटले आहे. पण याचे मूळ अथर्ववेदामध्ये आहे. तंत्रशास्त्र तीन भागांमध्ये विभागलेले आहे. आगम तंत्र, यामलतंत्र आणि मुख्य तंत्र. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या आत्मशक्तींना विकसित करून विविध शक्तींनी संपन्न होऊ शकतो.

9 )मंत्र मार्ग : मंत्र म्हणजे मनाला व्यवस्थित करणे. जेव्हा मन मंत्राच्या अधीन होतं तेव्हा ते पूर्ण होतं. प्रामुख्याने मंत्र तीन प्रकाराचे असतात. 1. वैदिक मंत्र, 2. तांत्रिक मंत्र आणि 3. शाबर मंत्र. मंत्र जपाचे तीन भेद आहेत. – 1. वाचिक जप, 2. मानस जप आणि 3. उपाशू जप.

10 )जाती स्मरण मार्ग : गत जन्माला जाणून घेण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयोगाला जाती स्मरण म्हटले जाते. नित्यक्रम सतत सुरू ठेवून मेमरी रिव्हर्स वाढवणेच जाती स्मरण विधी आहे. उपनिषद मध्ये जागृत, स्वप्न आणि झोपेबद्दल विस्तृत उल्लेख केला आहे. हे जाणून घेतल्यावर गतजन्माला जाणून घेऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या