तापी नदीत पाय घसरून पडल्याने भादलीच्या शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील भादली शिवारात तापी नदीच्या काठी गुरे चारतांना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून ुधाकर बाबुलाल सोवनणे (वय-38 रा. भादली बुद्रूक) या शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकरी सुधाकर बाबुलाल सोनवणे हे सोमवारी आपल्या भादली शिवारातील शेतात गेले होते.

दुपारी 3 वाजेच्या सुमारास शेतात गुरे चारत असताना सोनवणे यांचा तापी नदीत पाय घसरला आणि ते पाण्यात पडले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.

तापी नदीत त्यांच्या मृतदेहाचा शोध घेवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. सुधाकर सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी, आई असा परिवार आहे.

दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे, आर.के. राठोड हे करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *