Friday, April 26, 2024
Homeधुळेबारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन कौतुकास्पद - कृषी मंत्री दादा भुसे

बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन कौतुकास्पद – कृषी मंत्री दादा भुसे

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तळागाळातील प्रत्येक शेतकर्‍याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकर्‍यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केले.

- Advertisement -

महाडिबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते बारीपाडा येथे करण्यात आला,

त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावीत, चैत्राम पवार, पंचायत समिती सभापती प्रतिभा सुर्यवंशी, सरपंच सुनिता बागुल, अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.एम.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सि.के.ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री.भुसे म्हणाले की, बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. जुन्या बियाण्याचे जतन व संवर्धन करून चांगला उपक्रम राबविला आहे, हा उपक्रम अनुकरणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी देशबंधु ग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा मंत्री श्री.भुसे यांनी आढावा घेतला. सर्व सदस्यांशी संवाद साधत कंपनीच्या प्रगतीचा सर्व लेखाजोखा त्यांनी जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

पिक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतांना, मत्सपालनासाठी स्थानिक आदिवासी शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल ही संकल्पना यशस्वी ठरत आहे.

शेतकर्‍यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाडिबीटीच्या अनुषंगाने आता प्रत्येक शेतकर्‍याला केवळ एक पानी अर्ज एकदाच सादर करावा लागणार असून विविध योजनेसाठी वारंवार अर्ज सादर करण्याची गरज यापुढे भासणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी महाडिबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते पार पडला.

त्यानंतर मंत्री श्री.भुसे यांनी शेतकरी सोमनाथ चौरे व मोतीराम पवार यांच्या शेतशिवाराची पहाणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या