Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार - कृषीमंत्री दादा भुसे

ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार – कृषीमंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तराच्या पाठोपाठ आता ग्रामपंचायत Grampanchayats स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे weather stations उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. राज्यात मंडळस्तरावर २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाची आक़डेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने सुरुवातीला ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जातील, असेही भुसे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये महावेध प्रणाली अंतर्गत संकलित होणारी माहिती सुरक्षित राहील. यासाठी स्कायमेटने व्यवस्था करावी. सध्या फळपीक विमा राबविण्यात येत असलेल्या क्षेत्रात अशी केंद्रे आहेत. पहिल्या टप्प्यात किमान एका मंडळातील दोन ग्रामपंचायतीमध्ये तरी ही केंद्रे उभारावीत तसेच राज्यातील प्रत्येक विभागात ती असावीत, अशी सूचना कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

सध्या महावेध प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. विमा कंपन्याही ही माहिती स्कायमेटकडून घेतात. त्यामुळे अधिकाधिक भागात ही केंद्रे कार्यान्वित झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या