संगमनेर | प्रतिनिधी
आसाममध्ये आज तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होत आहे. आसाममध्ये ४० जागांसाठी मतदान होत आहे.
- Advertisement -
दरम्यान, मागील टप्यात झालेल्या मतदानात एका मतदान केंद्रावर मोठा घोळ झाला आहे. याप्रकरणी कारवाई करत निवडणूक आयोगाने ५ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रामध्ये केवळ ९० पात्र मतदारांची नोंद असताना तेथे प्रत्यक्षात १७१ जणांनी मतदान केल्याचे उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हाफलाँग मतदारसंघात हे मतदान केंद्र असून तेथे १ एप्रिल रोजी मतदान झाले, हाफलाँगमध्ये ७४ टक्के मतदान झाले. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने या मतदान केंद्रावरील पाच निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.