Friday, April 26, 2024
Homeराजकीय'..मग गोडसेबद्दल काय विचार आहे?'; ओवैसींचा सरसंघचालक भागवतांना सवाल

‘..मग गोडसेबद्दल काय विचार आहे?’; ओवैसींचा सरसंघचालक भागवतांना सवाल

दिल्ली । Delhi

‘कोणताही हिंदू हा भारतविरोधी असू शकत नाही. तो हिंदू आहे म्हणजे देशभक्त आहे. तो त्याचा मुलभूत स्वभाव आहे,’ असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS Chief) डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं आहे. ‘देशभक्तीचा उगम हा धर्मातूनच झाला आहे,’ या महात्मा गांधी यांच्या वाक्याचा त्यांनी याबात संदर्भ दिला आहे. यावर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -

भागवत यांच्या या वक्तव्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मग गोडसेबद्दल आपला काय विचार आहे? भागवत याचं उत्तर देतील का? गांधींजींचा हत्यारा गोडसेबाबत काय मत आहे? नेल्ली नरसंहारासाठी जबाबदार लोकांबाबत, 1984 च्या शीख विरोधी आणि 2002 गुजरात नरसंहार बाबत काय?” असा सवाल ओवैसींनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हे युक्तिसंगत आहे की, धर्मातील भेदभावाशिवाय अधिकतर भारतीय देशभक्त आहेत. ही फक्त आरएसएस संदर्भहिन विचारधारा असू शकते जी एका धर्माच्या लोकांना ऑटोमेटिकली देशभक्तीचं सर्टिफिकेट देत आहे. तर बाकी लोकांना आपलं जीवन देशभक्ती सिद्ध करण्यात घालवावं लागतंय.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

‘मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ (The Making of a True Patriot: Background of Gandhiji’s Hind Swaraj) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागवत म्हणाले की, देशभक्त ही संज्ञा मोजक्याच लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानत नाही. भारतात तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची, आपले मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. मात्र, महात्मा गांधीजी जे म्हणाले, ते विचार करण्यासारखे आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे. त्यामुळे हिंदू आहे म्हणजे तो आपोआपच देशभक्तही आहेच, त्याला ते असायलाच हवे.अर्थात, त्याला झोपेतून जागे करावेच लागते. मात्र, भारतविरोधी अथवा भारतद्रोही असा कोणीही नसतो. त्यामुळे ‘हिंदू देशभक्त’ ही संज्ञा म्हणजे ‘वदतो व्याघात्’ असा प्रकार आहे, असे भागवत म्हणाले.

भागवत पुढे म्हणाले की, ” वेगळेपणाचा अर्थ आपण एका समाज म्हणून राहू शकत नाही, असा नव्हे. विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख आहे.” या पुस्तकाचे लेखक जे.के. बजाज आणि एम.डी. श्रीनिवास यांनी गांधींजींचा पोरबंदर ते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका ते भारतामध्ये परतण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात लिहिला आहे. ‘गांधीजींना त्यांच्या मुस्लीम मालकानं तसंच अनेक ख्रिश्चन सहकाऱ्यांनी धर्मांतरचा आग्रह केला होता. मात्र गांधीजींनी तो आग्रह मानला नाही. त्यानंतर ते 1905 पासून समर्पित हिंदू बनले’, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या