श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील अधिकृत अशोकनगर पोलीस चौकी ही हरेगाव फाटा येथे पळविल्याप्रकरणी मागील महिन्यापासून वाद सुरू होता.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी समक्ष ग्रामस्थांशी संवाद साधून अशोकनगरची चौकी ही अशोकनगरलाच असल्याचे सांगितले.
याप्रकरणी निपाणी वडगावचे सरपंच आशिष दौंड, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष राऊत, मल्हार सेनेचे अध्यक्ष संजय राऊत व भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी गावकर्यांच्यावतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर 4 सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
त्याकरिता ग्रामपंचायतीचे तक्रारींचे निवेदनही देण्यात आले होते, गावची अधिकृत सजेची पोलीस चौकी ही पूर्ववत ठिकाणी अशोकनगर येथेच चालू ठेवण्यात येऊन ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करणे व गावातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारीवर चाप लावणे करिता सदर चौकीच्या नेमणुका असणार्या पोलिसांना चौकी बंद न ठेवण्याचे आदेश द्यावेत व हरेगाव फाटा येथे अशोकनगर फाटा पोलीस चौकी हे केलेले बेकायदेशीर नामकरण त्वरित हटवावे. या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
यावेळी सोपानराव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस सुनीताताई गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर राऊत, संजय गायधने, रवींद्र पवार,संजय राऊत, दीपक राऊत, दिलीप राऊत, ज्ञानेश्वर खाडे, हमीद शेख, प्रशांतराजे शिंदे, ज्ञानेश्वर पडोळे, आप्पासाहेब दुशिंग, भारत वैरागर, दादासाहेब कापसे, बबन पाटोळे, आबा काळे, दादा राऊत तसेच पो.कॉ. लोंढे, लोटके, किशोर जाधव, पोपट खराडे आदींसह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले.