श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
निळवंडे धरणाच्या प्रवरा डावा कालव्यातून शेतीचे आवर्तन सुरू करण्यात आले असून शेतकरी बांधवांनी पाटबंधारे विभागाच्या शाखेत जाऊन जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज भरून पाणी मागणी नोंदवावी, असे आवाहन अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व श्रीरामपूर येथील वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वसंत शिंदे यांनी केले आहे.