लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांची बस दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, ४५ जखमी

दिल्ली | Delhi

आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री एक बस दरीत कोसळून ७ प्रवाशांचा बळी गेला. तर ४५ जण जखमी झाले.

तिरुपतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बक्रपेटा भागात चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस कठड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत बचावकार्यात सुरु केले. काही वेळाने पोलीस आणि प्रशासनाच्या पथकासह बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार असल्याने बचावकार्यात अडचण निर्माण झाली. अशा स्थितीत रविवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बस एका लग्न समारंभासाठी जात होती. वाटेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस प्रथम खडकावर आदळली आणि त्यानंतर दरीत कोसळली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *