अहमदनगर | Ahmednagar
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे थांबलेला गणेशोत्सव यंदा नव्या उत्साहाने साजरा झाला. आज अनंत चतुर्दशी निमित्त निघालेली विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांना आनंदाची पर्वणी ठरली आहे. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या ‘बाप्पा’ला निरोप देण्यात आला.