मुंबई –
मराठा आरक्षणासंदर्भात 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनालाही बाजू मांडावी
लागणार आहे. मधल्या काळात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (21 जानेवारी) केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे असे सांगितले.