अकोले (प्रतिनिधी)
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप अखिल
भारतीय किसान महासभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी केला आहे. अर्थसंकल्पातून सरकारने कॉर्पोरेट घराण्यांचे भले करण्याचा संकल्प केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.