Friday, April 26, 2024
HomeधुळेPhotos #अहिराणी संमेलन हे साहित्याचे नव्हे तर संस्कृतीचे!

Photos #अहिराणी संमेलन हे साहित्याचे नव्हे तर संस्कृतीचे!

धुळे dhule। प्रतिनिधी

अहिराणी संमेलन (Ahirani Samelan)हे साहित्याचेच नाही तर संस्कृतीचे (culture) सुद्धा आहे, कारण अहिराणी भाषा प्राचीन संस्कृती, तत्त्वज्ञान शिकवीत असते. भाषा ही जगण्याची रीत झाली पाहिजे, अहिराणी साहित्य स्वतंत्र असावे, नवीन साहित्याची निर्मिती अहिराणीमध्ये झाली पाहिजे आपण ओरिजनल आहोत, कधीही अनुवाद करू नका आपल्या संस्कृतीवर, खांद्यावर, देवावर, निसर्गावर साहित्य लिहा. जसे आपण जगत आहोत तेच साहित्यामध्ये उतरविले गेले पाहिजे. असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक आणि लेखक उत्तम कांबळे (Uttama kambaḷe) यांनी केले.

- Advertisement -

पुढे बोलतांना कांबळे म्हणाले की, अहिराणी भाषेचा सुगंध कधीही प्रमाण भाषेणे समजून घेतला नाही. त्यामुळे यापुढे स्वतंत्रपणे अहिराणीमध्ये आपले स्वतःचे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. ऐंशीच्या दशकापासून जगात बोलीभाषा वाचविण्यासाठी चळवळी उभारल्या जात आहेत. माझी परंपरा, माझी संस्कृती, माझा इतिहास, भूगोल सुरक्षित कसा राहील? यासाठी लढा सुरू आहे, भाषा संरक्षण शास्त्राचे अभ्यासानुसार रोज तीन बोलीभाषा मरत आहेत. भारतात अजूनही बोली भाषेच्या नोंदी नाहीत. भाषेचे मरण हे मानवी युगाचे मरण असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आज आपल्याला भाषा वाचवण्याची वेळ का आली, तर जागतिकीकरणामुळे भाषावर अरिष्ट आले आहे. आपण आता सर्वजण सर्वत्र इंग्रजीचा वापर सर्रासपणे करीत असतो. त्यामुळे मातृभाषेला आणि बोलीभाषेला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. बोलीभाषा व मातृभाषेवरचा विश्वास डळमळीत होत चाललेला आहे. दुबंगलेली लोक भाषेची लढाई कधीच जिंकू शकत नाही, म्हणून भाषा आपण जगली पाहिजे.

यापुढे भाषा, संस्कृती, साहित्य वाचवण्यासाठी कोणावरही विसंबून न राहता आपण स्वतः त्यासाठी लढले पाहिजे. खान्देशाचे लोकजीवन आणि साहित्य अतिशय समृद्ध आहे. परंतु ते आता पुढे आणण्याची जबाबदारी नव्या दमाच्या खान्देशातील साहित्यिकांवर आहे, असे यावेळी उत्तम कांबळे यांनी सांगितले.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, राजकारणामध्ये माझे आवडते नेते म्हणून रोहिदास पाटील हे आहेत कारण त्यांनी खान्देशासाठी लढा दिलेला आहे. आज त्यांचेच वारसदार म्हणून आ. कुणाल पाटील हे अहिराणी भाषेचा रथ समर्थपणे ओढत आहेत.

गौराई पूजनाने उद्घाटन

खान्देश साहित्य संघ आयोजित सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खान्देशाचे दैवत आणि प्रतीक गौराई मातेच्या पूजनाने करण्यात आले. व्यासपीठावर कानबाई, गौराई, भुलाबाई यांचीही विधिवत पूजा करून मांडणी करण्यात आली होती.

अहिराणीची धूरा आ.पाटील यांच्या खांद्यावर

खान्देश, खान्देशाची संस्कृती आणि अहिराणी भाषेचा माजी मंत्री रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील यांनी नेहमीच अभिमान बाळगला आहे. सलग तीन अहिराणी साहित्य संमेलन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठबळाने सुरू आहेत. आपल्या अहिराणी भाषेला राजाश्रय मिळाल्याचे समाधान खर्‍या अर्थाने खान्देशाचा अभिमान व अहिराणीचा अभिमान असणार्‍या साहित्यिक आणि जनतेला झाला आहे. आज सकाळी निघालेल्या दिंडीचे पालखी पूजनानंतर आ. कुणाल पाटील यांनी खर्‍या अर्थाने अहिराणीची धुरा आपल्या खांद्यावर घेत हा वसा समर्थपणे पुढे नेण्याचा संदेशच दिला.

दिंडीत घडले खान्देश संस्कृतीचे दर्शन

महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज, गोंधळी, व्हलर वाजा, लग्नाचे देवत, भजनी मंडळ असे खान्देशातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखावे सादर करण्यात आले होते. कानबाईचे गाणे, आदिवासी नृत्य, अहिराणी गाणे यामुळे वातावरण भारावून निघाले होते.

आ.कुणाल पाटील यांनी धरला ठेका

दिंडीमध्ये खानदेशी वाजंत्री, आदिवासी वाद्य तसेच वल्हर वाजंत्रीवर आ. कुणाल पाटील यांनी ठेका धरला. त्यामुळे आ. कुणाल पाटील हे अहिराणीच्या या उत्सवात एकरूप झाल्याचे दिसून आले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी तसेच साहित्यिकांनीही धरला ठेका.

अहिराणी साहित्याचा झेंडा आहे सावकार, कारखानदार, भांडवलदार हे कधीच राष्ट्र निर्माण करू शकत नाही, तर साहित्य, कवी, लेखक पत्रकार हेच खर्‍या अर्थाने राष्ट्राची उभारणी करीत असतात. घराघरात अहिराणी भाषा बोलली गेली पाहिजे तरच अहिराणी भाषेचे संवर्धन होईल. गेल्या चार अहिराणी संमेलनांना आधार देण्याचे काम रोहिदास पाटील यांनी केले आहे. म्हणून आज अहिराणी साहित्याचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रात फडकत आहे.

-सुभाष अहिरे, साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष

अहिराणी भाषा ही आपली आई इतर साहित्य संमेलनांना शासनाची आर्थिक मदत असते, परंतु अहिराणी साहित्य संमेलन हे साहित्यिकच भरवत असतात त्यामुळे खर्‍या अर्थाने ती अभिमानाची बाब आहे. धुळ्याची भूमी साहित्यिक, क्रांतिकारकांची, समाजसेवकांची भूमी आहे. त्यामुळे खान्देशात निर्माण होणारे साहित्य हे अभिमानास्पद आहे. अहिराणीमध्ये दर्जेदार साहित्य निर्माण होण्याची गरज असल्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहिराणी भाषा ही आपली आई आहे, तरीही आज आपल्याला अहिराणी बोलण्याची लाज वाटते अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. मी अखेरच्या श्वासापर्यंत अहिराणीसाठी काम करणार.

-रमेश बोरसे, सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

मजा मा शेत का सगळा? -अलीचे डिप्लोरियान

अहिराणी संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून इटली येथील अलीचे डिप्लोरियान या खान्देश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणीतून करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी राम राम मंडई! मजा मा शेत का सगळा? मी इटलीनीशे, पण तुम्हना अहिराणीवर प्रेम करस असे सांगून त्यांनी अहिराणी भाषेतच परिचय करून दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, अहिराणी बोलणार्‍यांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे अहिराणी साहित्याचे लिखाण वाढले पाहिजे व अहिराणीचे महत्त्व वाढवण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत.

अहिराणी भाषेसाठी काम करा

ज्या-ज्या ठिकाणी अहिराणी आणि खान्देश आहे. त्या-त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा राहिल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला अहिराणीचा वेलू गगनावर घेऊन जायचा आहे. अहिराणी जतन करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे अहिराणीच्या या उत्सवात मनापासून सहभागी होऊन सर्वांनी अहिराणी भाषेसाठी काम केले पाहिजे.

-आ. कुणाल पाटील

मान्यवरांची उपस्थिती

संमेलनाला माजी मंत्री रोहिदास पाटील, सौ. लताताई रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील, उत्तम कांबळे, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, इटली या देशाच्या खान्देश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान, माजी आ. शरद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनाप्रमुख अतुल सोनवणे, डॉ. सुशील महाजन, साहित्यिक कृष्णा पाटील, जगदीश देवपूरकर, नृत्य दिग्दर्शक संतोष संकद, साहित्यिक रमेश सूर्यवंशी, रत्नाताई पाटील, विश्राम बिरारी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, डॉ. दरबारसिंग गिरासे, साहेबराव खैरनार, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अशोकभाऊ सुडके, डॉ. दत्ता परदेशी, संतोष राजपूत, कृष्णा पाटील, रमेश सूर्यवंशी, डॉ. कृष्णा पोतदार, कुणाल पवार, सोमदत्त मुंजवाडकर, रमेश उची, प्रभाकर शेवाळे, डॉ. अविनाश जोशी, निंबाजीराव बागुल, आप्पा खताळ, वृषाली खैरनार, शरद धनगर, रमेश धनगर, प्रवीण पवार, के. बी. लोहार, मोहन कवळीदकर, जितेंद्र बहारे, सारिका रंधे, डॉ. शकुंतला चव्हाण, गो.पी. लांडगे,नरेंद्र खैरनार आदींची उपस्थित होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या