Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेतकरी कायद्याविरोधात मंगळवारी जेलभरो

शेतकरी कायद्याविरोधात मंगळवारी जेलभरो

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.

- Advertisement -

तसेच शेतकर्‍यांच्या विरोधात असणार्‍या कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर शेतकर्‍यांनी 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत शहरात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राजेंद्र करंदीकर, डॉ. भास्कर रणनवरे, बाळासाहेब पातारे, सुभाष गायकवाड, सुरेश गायकवाड, संपत पवार, सुधाकर पातारे, मुक्ती अल्ताफ, जैद शेख, अशोक साळवे, श्याम काते, इमरान सय्यद, शिवाजी भोसले, अशोक साळवे, मनोहर वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पाश्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यात आला असून, मंगळवार जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 3 वाजता कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधात मंजूर केलेले काळे कायदे त्वरीत मागे घेण्यात यावे, शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळावा व शेतकर्‍यांकडून अल्प दरात माल खरेदी करुन जास्त भावाने विक्री करणार्‍या दलालांवर कारवाई होण्यासाठी लोकसभेत नवीन कायदा पारीत करावा, देशातील निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या