Saturday, April 27, 2024
Homeनाशिकस्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनाला इगतपुरी तालुक्यातुन शेकडो पदाधिकारी हजेरी लावणार

स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनाला इगतपुरी तालुक्यातुन शेकडो पदाधिकारी हजेरी लावणार

इगतपुरी । प्रतिनिधी

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शेती, सहकार, कामगार, शिक्षण, आरोग्य या पंचसूत्री प्रमाणे आपण वर्षभरात जे काही काम केले आहे त्या कामाचा लेखाजोखा या वर्धापन दिनाला होणार आहे असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी केले.

- Advertisement -

स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापनदिन मुंबई येथे रविवार दिनांक २७ ऑगष्ट रोजी मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर इगतपुरी तालुक्यातील कपीलधारा येथे आढावा बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत केशव गोसावी बोलत होते.

या आढावा बैठकीत स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, राज्य कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, नवनाथ शिंदे, विजय वाहुळे, पुष्पाताई जगताप, कसमादे जिल्हाप्रमुख आशिष हिरे, महीला आघाडीच्या मनोरमा पाटील, रेखा जाधव, रेखा पाटील, युवा आघाडीचे जिल्हाप्रमुख नितीन दातीर, कामगार आघाडीचे दिनेश नरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्वराज्य पक्ष हा सर्वसामांन्य, गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी यांचे व्यासपीठ आहे. आज महराष्ट्रात चाललेल गलिच्छ राजकारण बघता छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष हा एकमेव पर्याय जनतेला दिसतो आहे अशी माहिती स्वराज्य जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी दिली. या वर्धापन दिनासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने स्वराज्यचे शिलेदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार असून संपूर्ण मुंबईमध्ये स्वराज्याचे भगवे वादळ धडकणार असल्याचा संकल्प सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.

व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख नारायन जाधव, संपर्क प्रमुख शिवाजी गायकर, उप.ता प्रमुख सखाराम गव्हाणे, कृष्णा गभाले, दिपक खातळे, आघाडी तालुका प्रमुख शिवाजी काजळे, हरिष कुंदे, गोकुळ धोंगडे, ऋतिक जाधव, विवेक वारुंगसे, उत्तम चिमटे, कैलास गव्हाणे, बाळु सुरुडे, गणेश नाठे, अमोल धोंगडे, अजय कश्यप, सुमित कडवे यांच्यासह महानगरप्रमुख, जिल्हा पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत वाडीव-हे ग्रा.सदस्य रोहीदास टिळे, किरण धांडे, शालुताई हंबीर यांना नवीन पदनियुक्ती देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या