Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याचे १० हजार कोटींचे पॅकेज

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याचे १० हजार कोटींचे पॅकेज

मुंबई

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री म्हणाले. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचे बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.

रस्ते- पूल – 2635 कोटी
नगर विकास – 300 कोटी
महावितरण ऊर्जा – 239 कोटी
जलसंपदा – 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा – 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी – 5500 कोटी

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, एकूण केंद्राकडून येणे ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपय प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

-फळबागासाठी प्रति हेक्टरी २५ हजार मदत दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे.

– पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत.

- Advertisment -

ताज्या बातम्या