Thursday, April 25, 2024
Homeनगर34 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

34 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

108 शिक्षकांना कारवाईतून वगळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – जून महिन्यांत झालेल्या शिक्षकांच्या बदल्यामध्ये काही शिक्षकांनी अन्याय झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षकांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र, तीन महिने उलटले तरी कारवाई झालेली नव्हती. याबाबत दै.‘सार्वमत’ ने आवाज उठविताच प्राथमिक शिक्षण विभागाने कारवाईची फाईल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवली आहे. त्यात 34 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तर 108 शिक्षकांना कारवाईतून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

जून महिन्यात झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकियेत त्रुटी राहिल्याने त्यातील काही शिक्षकांनी न्यायालयात, विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती. मात्र, त्यावर न्यायालयाने याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांच्या हरकतीवर निर्णय घेण्यास टाळले होते.

आता शिक्षण विभागाने झालेल्या सुनावणीच्या इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपुढे ठेवले आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 186 पैकी 108 शिक्षकांवर असलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. 34 शिक्षकांबाबतच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य आढळले असून, या 34 जणांची तपासणी एनआयसी मार्फत करण्याचे सुचविण्यात आले आहे.

186 पैकी 16 शिक्षकांच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे पत्र तक्रारदारांनी दिले आहे. 4 जणांनी आपसी बदलीसाठी अर्ज केल्याने त्यांची तक्रार नसल्याचे दिसते. 3 जणांनी थेट न्यायालयातून सोयीच्या बदलीचा निकाल आणल्याने त्याबाबत निर्णय झाला आहे. 1 शिक्षक पदावनत झाल्याने त्याचाही प्रश्न मिटला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या