अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव विविध सहकारी सेवा संस्थेत एका वर्षाच्या कालावधीत सव्वा दोन कोटींचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान या प्रकरणी द्वारकानाथ राजहंस यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे सचिव व कर्मचारी अशा दोघांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष हौसराव दळवी व ईश्वर पंढरीनाथ गोधडे अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नवे आहेत. फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे कि, वरील दोघेही कामावर असताना १ एप्रिल २०१८ ते १ मार्च २०१९ या एका वर्षाच्या कालावधीत त्यांच्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करूत संगनमत करून २ कोटी २३ लाख ४८ हजार सहाशे ९९ रुपयांचा अपहार केला आहे.
सव्वा दोन कोटींचा अपहार करून फौजदारी पात्र न्यास भंग करून संस्थेच्या सभासदांचा संचालकांचा, बँकेचा, संस्थेचा लेखापरीक्षकाचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याने याबाबत सचिव व स्थानिक कर्मचारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे