राज्यात करोना प्रसाराचा वेग काही ठिकाणी कमी होताना दिसत असला तरी लसीकरणातील व्यत्यय आणि लस केंद्रावर होणारी गर्दी काळजी वाढवत आहे. यावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही उपाय सुचविले आणि त्याची अंमलबजावणी राहुरी तालुक्यात सुरू केली आहे. काय आहेत हे उपाय, त्यातून काय परिणाम साधला जाणार यासह लसींची उपलब्धता, सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजना यासंबंधी प्रश्नांना त्यांनी ‘सार्वमत संवाद’ या कार्यक्रमात उत्तरे दिली. त्यांच्याशी झालेला व्हिडिओ संवाद…