धुळे । Dhule
धुळे जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागे राहिला. याचे कारण या जिल्ह्याला विकासाचे व्हिजन असणारे सक्षम नेतृत्व मिळाले नाही. यामुळे जिल्ह्याचे नुकसान झाले. मात्र भविष्यात युवकांमधूनच नेतृत्व उदयास येईल असा आत्मविश्वास युवा आघाड्यांच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. दै.देशदूतच्या संवाद कट्टा या लाईव्ह कार्यक्रमात आज ‘राजकीय पक्षांच्या आघाड्या करतात तरी काय?’ या विष्यावर चर्चा करण्यात आली.