धुळे । Dhule
भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून याचा दूरुपयोग करीत कायद्याची चौकट छेदण्याचा प्रयत्न मिडीयाकडून होतांना दिसतो आहे. माहिती, प्रबोधनाची मुळ भूमिका असतांना प्रसार माध्यमे न्यायाधिशाची भूमिका वठवित असल्यामुळेच कायदेशीर प्रश्न निर्माण होत असल्याचा सूर आजच्या चर्चेतून उमटला. पत्रकारीता विकावू नसावी, असाही मुद्दा ठासून मांडण्यात आला.