धुळे । Dhule
राज्यात अपंगांसाठी अनेक योजना आणि सुविधा असल्या तरी त्या केवळ कागदावर आहेत. कारण या योजना अपंगांतील खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या संकुचित व कामचुकार मानसिकतेचा अडसर निर्माण होतो. यासाठी संघर्ष करावा लागतो. वास्तविक आम्ही अपंग असलो तरी आम्हाला कादेशीर हक्क हवे आहेत. केवळ सहानुभूती नको, अशी भावना चर्चेत व्यक्त करण्यात आली.