विकास दुबे एन्काऊंटर वरून यूपीचे राजकीय वातावरण तापले

jalgaon-digital
1 Min Read

कानपूर । Kanpur

कानपूर पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबे हा एसटीएफने कानपूर नजदीक चकमकी दरम्यान ठार झाला आहे. यावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत सरकारला प्रश्न विचारला आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, ” गुन्हेगाराचा अंत झाला, पण गुन्हा आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांचा काय?” असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

समाजवादी पार्टी चे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “या घटनेत गाडी पलटली नसून काही रहस्य उलगडून सरकार पडण्यापासून वाचवले गेले आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *