Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याहुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्प चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रकल्पाला केलेला विरोध. पोलिसांनी केलेली कारवाई. ग्रामस्थांचा विरोध जुगारून सुरू असलेले माती परीक्षण, उद्धव ठाकरे यांनी दिलेले पत्र, आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका यामुळे हा प्रकल्प चांगलाच तापला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच नाराणय राणे यांनी दिलेल्या आव्हानावरही भाष्य केलं. बारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. हुकूमशाही लादू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांनी दिले आहे. मी मन की बात करायला आलो नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. हे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. या गद्दारांना हाराष्ट्रातील ३ जिल्हे देखील ओळखत नव्हते. समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या