<p><strong>पुणे | Pune</strong></p><p>राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. </p>.<p>याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त करीत ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली त्यांना आता उत्तर मिळाले असेल असं म्हटलं आहे.</p><p>अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडे यांना या प्रकरणात आम्ही पाठीशी घालत असल्याचे आमच्यावर आरोप झाले. आम्ही पहिल्यापासून तपास पूर्ण होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या असं म्हणत होतो. मात्र, या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नाहक बदनामी झाली आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र, ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली त्यांना आता उत्तर मिळाले असेल असं म्हणत बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी नेता बदनाम होतो. अशा वेळी त्याचे कुटुंबही व्यथित होते. अशा चुकीच्या गोष्टींना जबाबदार कोण? अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा त्या नेत्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा जरा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे”,असे अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.</p>