अहमदनगर | Ahmednagar
महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडेल, असा दावा सातत्याने भाजप नेत्यांकडून करण्यात येतो. मात्र असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘आमचे सरकार हे पाच वर्षे पूर्ण करेल व राज्यात एक विकासाचे असे मॉडेल तयार करणे असे वक्तव्य आज भरणे यांनी नगरमध्ये पत्रकारशी बोलतांना केले.
राज्यमंत्री भरणे हे पुणे येथे जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष व्यवस्थित व्यवस्थित कारभारी राज्याला विकासाच्या बाबतीत मॉडेल हे सरकार करेल. आता महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी चर्चा मी नेहमीच नाही ऐकत आलोय. प्रत्येक दोन महिन्यात, चार महिन्यात अशी चर्चा होते. सरकार पाडण्याच्या तारकाही सांगितल्या जातात, परंतु हे सर्व चुकीचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्या चर्चा झाल्या नाहीत तर सामान्य माणूस, अधिकारी यांच्यात चलबिचल होत नाही. त्यामुळे आता चर्चा होणे साहजिकच आहे हे महाराष्ट्रात नाही तर कुठेही चालते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान यावेळी मंत्री भरणे यांनी नारायण राणे यांचाही यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक पंधरा दिवसाला त्यांचे वेगवेगळे वक्तव्य असते, म्हणून त्याविषयी मी काही बोलणार, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.