Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँँग्रेसच्या फुटीर आमदारांवर कारवाई करा

काँँग्रेसच्या फुटीर आमदारांवर कारवाई करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council elections)काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले. काँग्रेसने हंडोरे यांना २९ मतांचा कोटा ठेवला असताना त्यांना फक्त २२ मते पडली. याचा अर्थ काँग्रेसची सात मते फुटली असून या सात फुटीर आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे ४४ मते होती. काँग्रेस हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हांडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसरे उमेदवार भाई जगताप यांना मिळणार होती. मात्र या निवडणुकीत भाई जगताप विजय होऊन हांडोरे यांचा पराभव झाल्याने कॉंग्रेस आमदारांनीच पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

सात जणांचे भाजपला मतदान?

२० जूनला पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मते पडली. ७ जणांनी भाजपला मतदान केल्याने हंडोरे यांचा पराभव झाला. याची गंभीर दखल घ्या, अशी मागणी प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. भाजपला मते दिली असतील तर हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा निघतो. त्याचप्रमाणे दलित समाजात चुकीचा संदेश गेला आहे. ते कुठे तरी दिसले पाहिजे.हे प्रकरण दडपून टाकले तर बेशिस्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. मतदान करताना कोडिंग करण्यात आले होते. त्यामुळे कुठल्या आमदारांनी मतदान केले नाही हे आम्हाला माहीत आहे. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी आपल्याला अपक्ष आमदारांची मते मिळाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हिप झुगारला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या