आज सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. मुंबई पोलिसांसह महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारला
मोठा धक्का मानला जात आहे. यावरून यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fhadanvis) यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की, “ न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा !”