Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने राज्यात हिंदुत्वाचा गळा घोटला

मनसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने राज्यात हिंदुत्वाचा गळा घोटला

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मनसेनेच्या राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने (BJP) महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली….

- Advertisement -

राज यांच्या बहुचर्चित पत्रकारपरिषदेनंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपने मनसेनेला पुढे करुन हा विषय चर्चेत आणला. राज्यात अशांतता तसेच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असे खासदार राऊत म्हणाले.

राज्यात शिर्डी (Shirdi), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) यासह अनेक मोठ्या मंदिरांमध्ये सकाळच्या काकड आरत्या होतात. काकड आरतीला मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो, पण त्याचा आनंद घेण्यासाठी मंदिराच्या आसपास हजारो भाविक येत असतात.

आज भोंग्याचा विषय निर्माण झाल्यामुळे या देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत. तसेच हिंदू भाविकांची गैरसोय झाली त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही असे संजय राऊत म्हणाले.

हजारो नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. आमच्यावर अन्याय का होतो. शिर्डीतील हजारो लोकांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

ज्यांनी हे आंदोलन सुरु केले त्यांच्याविरुद्ध आता हिंदुंमध्ये जागृती होतेय, आणि हिंदुच रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, पण हिंदुंनी संयम राखावा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यात हिंदुंमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान असून यामागे भाजपचा हात आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या