शशी थरुर मोदींना 'Sorry' का म्हणाले?

जाणून घ्या
शशी थरुर मोदींना 'Sorry' का म्हणाले?

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी पोहोचले असून दोन दिवसांचा हा दौरा आहे. दरम्यान ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असं सांगितलं.

मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही मोदींवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चूक झाल्याचं लक्षात येताच थरूर यांनी प्रांजळपणे त्याची कबूल देत मोदींना सॉरी म्हटलं आहे.

शशी थरूर यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केलं होतं. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलंय हे सगळ्यांना माहिती आहे,’ असं मी म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला… सॉरी." असं शशी थरूर यांनी म्हंटल आहे.

काय म्हणाले होते शशी थरूर?

'आंतरराष्ट्रीय शिक्षण : आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिले.' अशी टीका शशी थरूर यांनी मोदींवर केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या. ते म्हणाले की, 'मी बांगलादेशातील बंधूभगिनी व येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं आंदोलन होतं. माझं वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती.' असं मोदी म्हणाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com