Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनिष्ठावान कार्यकर्त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल : डॉ.मोरे

निष्ठावान कार्यकर्त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल : डॉ.मोरे

शहादा – Shahada – ता.प्र :

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आहे .त्याचे श्रेय काहींनी पक्षाला न देता व्यक्तीगत घेतले आणि सत्तालालसेसाठी पक्ष सोडला मात्र आता व्यक्ती निष्ठेऐवजी पक्ष निष्ठेला महत्त्व दिले जाईल.

- Advertisement -

त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नवीन उभारी घेईल त्यासाठी संघटन ,विस्तारीकरण व मजबुतीकरण व हा अजेंडा घेऊन जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या फळी उभारून राष्ट्रवादी पक्ष सक्षमपणे उभा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी शहादा येथे आढावा बैठकीत केले

शहादा येथील शिवप्लाझा सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकित डॉ.अभिजित मोरे बोलत होते.

यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी, मराठा सेवा संघाचे मधु पाटील ,सरपंच रवींद्र पाटील भटु पाटील, नगरसेवक इकबाल शेख, नगरसेवक चंद्रकांत पाटील, राजेंद्र वाघ, सुरेंद्र कुवर,शांतीलाल साळी, आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ.अभिजित मोरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीतुन पक्षाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनात राज्यात आज सत्ता प्रस्थापित झाली आहे. जिल्ह्याच्या विकास पक्षाने केला मात्र एकच व्यक्ती श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत.गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक स्थित्यंतरे झाले आहेत,मात्र यापुढे पक्ष निष्ठेला महत्त्व देताना पक्ष कसा वाढेल यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यां मेहनत घ्यावी लागणार आहे.

कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी माजी आ.उदेसिंग पाडवी यांच्या पक्षातील प्रवेशामुळे संघटन अधीक मजबुत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी आ. उदेसिंग पाडवी मार्गदर्शन करतांना म्हणाले की आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात सुगीचे दिवस येणार असून जिल्हात एक नंबरचा असलेला हा पक्ष तीन नंबरवर कसा गेला याचे शल्य निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे.

त्यामळे कार्यकत्यार्ंनी आता मरगळ झटकून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सहकार्य करा. पक्षामध्ये निष्ठेने काम केल्यास निश्चितच त्याला न्याय मिळतो.

त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणी ही सर्वसमावेशक असेल याबाबत कार्यकर्त्यांनी मनात संकोच बाळगू नये.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता निष्ठावान कार्यकर्त्यांवर यापुढे अन्याय होणार नाही.

त्यांना न्याय देण्याचे काम पक्षात केले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नगरसेवक चंद्रकांत पाटील,राजेंद्र वाघ यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे सुत्रसंचलन एन.डी.पाटील यांनी तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या