Wednesday, May 8, 2024
Homeराजकीय'सत्य परेशान होता है, पराजित नहीं!'; निर्दोष मुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

‘सत्य परेशान होता है, पराजित नहीं!’; निर्दोष मुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

भुजबळ म्हणाले की, ‘आमच्या खोटे नाटे आरोप झाले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितलं. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केलं आहे.

तसेच, ED ची केस या प्रकरणावरुन बांधली गेली आहे. काही लोकांनी त्रासच द्यायचं ठरवलं होतं. आम्ही त्याचवेळी म्हटलं होतं, की सत्य परेशान होता है, पराजित नहीं. आम्ही विनम्रपणे हा निकाल स्वीकार करत आहोत. आमची कुणावरही तक्रार नाही. नियती कधी कधी दिवस आणते, ते भोगावे लागतात. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं या कटकारस्थानातून आम्ही मुक्त होत आहोत, असं ते म्हणाले. माझ्यावर पक्षानं, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले.

भुजबळांना दिलासा : महाराष्ट्र सदन प्रकरणात निर्दोष मुक्तता

अंजली दमानिया देणार हायकोर्टात आव्हान

दरम्यान, या प्रकरणी समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई सत्र न्यायालयाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत. “छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या