Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणूनच...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणूनच…; संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केला असून त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणून आज दिवसभर दोन्ही सभागृहात गोंधळ घालण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे…

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, राहुल शेवाळे यांनी काही कारण नसताना एक मुद्दा उपस्थित केला, कारण नसताना ते घसरले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली. विधानसभेत देखील विषय हा चर्चिला गेला, राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मोठी बातमी! जयंत पाटलांचे निलंबन

सुशांत सिंग राजपुत मृत्यूचा तपास सीबीआय, महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे. सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांत सिंहने आत्महत्या केली, असा अहवाल दिला आहे.

हे प्रकरण एनआयटी भूखंड घोटाळ्यामुळे काढण्यात आले आहे, रेवड्या वाटतात त्या प्रमाणे भूखंड वाटले. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकरण काढण्यात आल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गट-शिंदे गट पुन्हा एकत्र?; ‘पाहा’ नेमकं काय घडलं

राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, यामिनी जाधव यांच्या फाइल का बंद झाल्या? तुमच्या फाइल उघडायला लावू नका, तुमच्या फाइल सेंट्रल हॉलपर्यंत जाणार. आमच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरिट सोमय्या कुठं गेले आहेत असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या