मुंबई | Mumbai
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजल्यापासून मतमोजणीला झाली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी सरशी घेतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Nandigram Assembly Constituency : हॉटसिट ‘नंदीग्राम’मध्ये कोण आहे आघाडीवर?
तामिळनाडू आणि पॉन्डिचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.