Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : "...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही"; PM मोदींचा उल्लेख करत...

Sanjay Raut : “…तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला असून ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून आक्रमक होत उपोषण, आंदोलने आणि मंत्र्यांच्या गाड्यांची तोडफोड, जाळपोळ करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचे (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषण सुरु असून आज (०२ नोव्हेंबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे…

- Advertisement -

IND vs SL : रोहित सेना आज श्रीलंकेशी भिडणार; भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी

यावेळी बोलतांना राऊत म्हणले की, “सरकारला किती वेळ हवा आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. त्याच उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देत आहेत का? सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणे केंद्र सरकारच्याच हातात आहे. मात्र, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले असल्याने दुसरीकडे महाराष्ट्र पेटलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांना काही झालं तर महाराष्ट्र (Maharashtra) पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह राज्य सरकारवर निशाणा साधला.

Maratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

राऊत पुढे म्हणाले की, “सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? त्यासाठीच हे सर्व चालू आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) किमान दुरध्वनीवरून मनोज जरांगेंशी बोलले तरी पाहिजे. तेही बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का? मोदी एक-एक तास मन की बात करतात, जगभरात फिरतात, जगभरातील नेत्यांना मिठ्या मारतात, पण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपला जीव पणाला लावलाय त्याच्याशी बोलायला वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? त्यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे ना? त्यांनी जरांगे पाटलांचे प्राण वाचवावेत,” असेही राऊतांनी सांगितले.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी; म्हणाले,”चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत…”

पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आर्धे मंत्री असे आहेत जे तुरूंगात असायला हवेत. आसाम, उत्तरप्रदेशमधिल भाजपच्या (BJP) मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र विरोधीपक्षातील मंत्र्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे ममता बॅनर्जी म्हणतात ते खरं आहे. हा देश एकदा रिकामा करा आणि निवडणूक घ्या, असेही संजय राऊतांनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

लाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा

- Advertisment -

ताज्या बातम्या