मुंबई | Mumbai
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडीक यांनी महाविकास आघाडीच्या संजय पवार यांना धूळ चारली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काटें की टक्कर होती. मात्र, फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे संपूर्ण महाविकास आघाडी सरकार सपशेल फेल ठरल्याचे दिसून आले.
या निवडणूक निकालावर विविध प्रतिक्रिया येत असून संभाजीराजे छत्रपती यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्वीट करत सेनेला टोला लगावला आहे. ‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll’ तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll अशा ट्विट करत संभाजी राजेंनी केलं आहे.