निवडणुका नाही तर उगाच भिजत भाषण का करायचं?; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

jalgaon-digital
1 Min Read

पुणे | Pune

गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मशिदींवरील भोंगे (Loud Speaker) हटवण्याबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले. राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होत आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे…

सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. निवडणुकाच नाहीत तर उगाच भिजून का भाषण करायचे? सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून नदी पत्रातील सभा रद्द केली, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *