पुणे | Pune
आज पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे…
ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. बोलताना उदयनराजे भावुक झाल्याचेही दिसून आले.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक जण चुकीचे बोलतात. विविध चित्रपटात चुकीचे चित्रिकरण केले जाते. आता याचा जनतेनेच विचार करायला हवा.
विकृतीकरण थांबायला हवे. महापुरुषांची बदनामी हा देशद्रोहाचा गुन्हा का ठरू नये? नव्या पिढी पुढे आपण कोणता विचार मांडणार आहोत, असा सवाल त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत उदयनराजे भावुकदेखील झाले. सध्या जे काय चालले आहे ते सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी घराण्याचा वारसदार म्हणून बोलत नाही तर तुमच्यासारखा एक सामान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून बोलत आहे. कधीकधी असा विचार येतो की हे सर्व पाहण्यापेक्षा मी मेलो का नाही, असे त्यांनी म्हटले आहे.