नवी दिल्ली | New Delhi
नीतीश कुमार यांनी आपल्या राजकीय संन्यासाबाबत यूटर्न घेतला आहे.
मी रीटायरमेंटविषयी काही म्हटलोच नव्हतो, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगीतले. कोणत्याही निवडणूक प्रचार सभेत मी राजकीय संन्यासाविषयी बोललो नव्हतो. माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. प्रत्येक प्रचार सभेत ‘अंत भला तो सब भला’ हे वाक्य त्या सभेसाठी मर्यादित असते, असे ते म्हणाले.
बिहार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पूर्णिया येथील सभेत ‘माझी ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आव्हान त्यांनी मतदारांना केले होते. मात्र आता या वक्तव्यावरून त्यांनी पलटी मारली आहे.
त्यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने त्यांना टोला लगावला होता. लालू यादव यांच्या अकाऊंटवरून एक जुना व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला होता. त्यात भाजपाशी पुन्हा हातमिळवणी करणार नाही, असे म्हणताना नितीशकुमार दिसतात.