संगमनेर (प्रतिनिधी)
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात बोलतांना म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारला 80 टक्के जनतेने मतदान केले आहे. आघाडी सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगलेच मिळाले आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीवर राहिला आहे. विदर्भासह मराठवाड्यातही काँग्रेसने आघाडी किती आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दिली आहे.