Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं...”

नितेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं…”

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं, असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

- Advertisement -

नितेश राणे म्हणाले, हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू वर अन्याय झाला नसता, हिंदूंच्या देवी-देवतांवर, उत्सवांवर रोख लागले नसते. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे असे म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष केले आहे.

मामाचा खून करणार्‍या भाचाला जन्मठेप

लाव रे तो व्हिडिओ म्हणत नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हाच दुवा पकडत पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्…. पाहा VIDEO

नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नीतेश राणे म्हणाले, मविआ संविधान मानत नाही. ते शरीया कायदा पाळणारे लोक आहेत. तोच कायदा हे लोक पाळतात. संविधान पाळत असते तर आमच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या देवतांवर अन्याय झाले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी संजय पांडे हा उद्धव ठाकरेचा जावई म्हणून फिरायचा. तो संजय पांडे रझाकारांबरोबर इफ्तार पार्टी करत असतो.

Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

नितेश राणे म्हणाले, प्रियांका गांधींच्या कर्नाटक येथील भाषणाची क्लिप संजय राऊतांनी ट्विटरवर टाकली आहे. ज्यांना भाषणाबाबत काहीच कळले नाही. ज्यांची बौद्धीक पात्रता नाही तेच प्रत्युत्तर देऊ शकतात. राऊतांना मोदींचे भाषण कळते का? जे काँग्रेसवाले पंतप्रधानांना शिव्या देतात त्या काँग्रेसजनांची यादी मोदींनी जाहिर केली. आणि याबाबत प्रियांका गांधीच्या टीकेची लिंक संजय राऊत सारखा शेअर करतो.

तात्पुरते लग्न करून युवकाला दोन लाखांचा गंडा

अमित शाह मुंबईत आल्यावर मुंबईकरांना धडकी भरली पाहिजे. हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र आहे, असे राऊतांनी सामनाच्या अग्रलेखांमध्ये म्हटले आहे. यावर राणेंनी निशाणा साधला आहे. मुंबई म्हणजे आदित्यच्या मित्राची पॅन्ट नाही जी पडेल. शाह या आडनावाची तुम्हाला एलर्जी आहे. हे आडनाव तुम्हाला चालत नाही. पण गुजराती माणसांचा पैसा मात्र ठाकरेंना चालतो. हे ठाकरे ज्यावेळी परदेशात फिरायला जातात त्यावेळी यांचा खर्च कोण करतं. प्रवासाच्या तिकिटापासून, हॉटेलचा खर्च, शॉपिंगचा खर्च हे सगळं मुंबईचे बिल्डर करतात, असा आरोप राणेंनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या