जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आव्हाडांनी आपला राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी जयंत पाटील आज मुंबईला आले.

मात्र, आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *