Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“तो मारुतीही देवळाबाहेर येऊन हसत विचारत होता…”; जितेंद्र आव्हाडांची बावनकुळेंवर खोचक टीका

“तो मारुतीही देवळाबाहेर येऊन हसत विचारत होता…”; जितेंद्र आव्हाडांची बावनकुळेंवर खोचक टीका

मुंबई | Mumbai

‘मिशन मुंबई’बरोबरच भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन बारामती’ देखील हाती घेतले आहे. पवार कुटुंबीय ज्या मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडायचे त्याच कन्हेरीच्या हनुमान मंदिरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

”१९९० नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…’ असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे आव्हाड म्हणतात ‘बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?. ‘बावन’कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे.’

- Advertisment -

ताज्या बातम्या