मुंबई | Mumbai
सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha election) धुम सुरू आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर २० जून रोजी राज्यातील १० विधान परिषदेच्या (MLC election) जागांसाठी निवडणुक होईल.
- Advertisement -
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केलीय. आणि शिवसेना आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीकडून (NCP) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिलीय.