Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयजगाचा पोशिंदा जगायलाच हवा !

जगाचा पोशिंदा जगायलाच हवा !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दिल्ली येथे मागील आठ दिवसांपासून शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर व राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव ग्रामीणतर्फे आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, जगाचा पोशिंदा जगायलाच हवा!, शेतकर्‍यांना न्याय मिळालाच हवा, अशा विविध घोषणाबाजी करीत आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी महानगर व जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा आकाशवाणी चौकात आला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या मोर्चामध्ये माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक, आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, संजय गरुड, कल्पना पाटील, मंगला पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, युवा महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, राजेश पाटील, तिलोत्तमा पाटील, सोपान पाटील, अन्वर खाटीक, एस. महाजन, सलीम इनामदार, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, रहीम तडवी, कौसर काकर, अ‍ॅड. कुणाल पवार, अ‍ॅड. राजेश गोयर, लता मोरे, जयश्री पाटील, कमल पाटील, मनीषा चौहान, ममता तडवी, अरविंद मानकरी, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकूर, तुषार राणे, मोहन पाटील, गणेश निंबाळकर, अक्षय वंजारी आदींचा सहभाग होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या